मुंबई : राज्यात ऑपरेशन टायगरनंतर पुन्हा एकदा मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. शिवसेना उबाठाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आज राज्यातील विधान परिषद निवडणुकींचा निकाल सुद्धा जाहीर झाला. यात अमरावती, नागपूर, उस्मानाबाद याठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी थेट भाजपला मतदान करून भाजपचा विजय घडवून आणला.
यावर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक प्रतिक्रिया देतांना म्हटले की, शिवसेनेच्या ९ पैकी ६ खासदार भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेत सामील झाले आहेत.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या शेकडो नगरसेवकांनी भाजप व भाजप-नेतृत्वाखालील महायुतीच्या उमेदवारांच्या बाजूने क्रॉस-व्होटिंग केले.
ज्या पाकीट पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांनी संविधान, लोकशाही आणि आरक्षण वाचवण्यासाठी भाजपविरोधात त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते, त्या पत्रकारांच्या आणि विचारवंतांच्या घरासमोर फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी शांततापूर्ण मोठे आंदोलन केले पाहिजे. त्यांनी पाठिंबा दिलेले उमेदवार आणि पक्ष एकतर भाजपमध्ये सामील झाले किंवा त्यांनी भाजपला मतदान केले. काही निर्लल्ज लोकांनी फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांची दिशाभूल केली. त्यांना जबाबदार धरले पाहिजे, असे आवाहन केले आहे.