सांगली : तब्बल दहा दिवस सर्व मतमोजणी प्रक्रिया पुढे ढकललेली आहे. सामान्य लोकांचे सुद्धा म्हणणं आहे की ह्या दहा दिवसात काहीतरी गडबड होऊ शकते. निवडणूक प्रक्रिया अशी आजवर बघितली नाही. साताऱ्यात सुद्धा प्रशासकीय यंत्रणा नव्हती मतदान केंद्रावर संपूर्ण गोंधळ होता. अधिकाऱ्यांना फोन केला त्यावेळी स्ट्रॉंग रूम सील असल्याचे कळाले. कुठलंही प्रोसेस केले नाही, फक्त सील केलेले दाखवले आहे. ही निवडणूक संपूर्ण गोंधळात घालवलेली आहे. निवडणूक अधिकारी कोणाचे काही ऐकत नाही, कोणाकडे न्याय मागायचा ? असा प्रश्न पडला आहे. आंदोलकांचे विशेष अभिनंदन करतो, की त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी पुढाकार दर्शवला, अशी प्रतिक्रिया बोलताना व्यक्त केली.
आष्ट्यात स्ट्रॉंग रूम बाहेर गोंधळ..!
