उलवे नोड : उरणमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निव्रडणुकीत पक्षांतर करून निवडणूक लढविणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मतदारांनी हाय व्होल्टेजचा झटका दिला आहे, अशा सर्वच उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे.
उरण तालुक्यातील नवघर जिल्हा परिषदेच्या २०१७मध्ये झालेल्या निवडणुकीत उद्धवसेनेचे विजय राजाराम भोईर हे निवडून आले होते. मात्र, पक्षाचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार यांच्या मनमानीला कंटाळून ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजपनेही पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवून नवघर जिपच्या निवडणुकीत तिकीट देण्याचे निश्चित केले होते. परंतु, सोडतीत मतदारसंघ महिलांसाठी आरक्षण निघाले. यामुळे त्यांच्या मातोश्री प्रभावती भोईर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, मतदारांनी झिडकारल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
- उमेदवारांच्या पक्षांतरामुळे नाराजी
जासई जिल्हा परिषद गटात भाजपने जोशी यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, त्यांनासुद्धा मतदारांनी पराभूत केले. कापचे माजी सभापती अँड. सागर कडू यांच्या पत्नी सिद्धी कडू यांना प्रवेश देऊन उद्धव सेनेने चाणजे जिप गटातून उमेदवारी दिली होती. त्यांनाही मतदारांच्या नाराजीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले. चिरनेर गटात भाजपमध्ये दाखल झालेल्या देवेंद्र पाटील यांचे कुटुंबच शेकापत होते. त्यांनी निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पाटील यांनाही मतदारांच्या नाराजीमुळे पराभव पत्करावा लागला आहे. - मतदारांनी पक्ष बदलणाऱ्यांना नाकारले
केगाव गणातून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसचे माजी सरपंच राजेंद्र ठाकूर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनाही मतदारांनी पराभूत केले आहे. आवरे गणातून शेकापच्या माजी सभापती समिधा म्हात्रे यांनीही भाजपमध्ये प्रवेश उमेदवारी मिळवली होती. त्यांनाही मतदारांनी झिडकारले आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY