ठाणे : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेना ही दिवसेंदिवस वाढणारी संघटना असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची प्रगती होत असल्याचा दावा त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाण्याची भूमिका घेतल्यामुळे शिवसैनिक पक्ष सोडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, खासदारांच्या कथित फुटीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर अफवा पसरवत असल्याचा आरोप केला.

यावेळी त्यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढत्या नेतृत्वामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचा दावाही केला. ठाकरे गटाच्या बैठका आणि मेळाव्यांवरही टीका करत, पक्षातील नेते आणि पदाधिकारी सातत्याने साथ सोडत असल्याचे म्हस्के यांनी म्हटले.