चिपळूण : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. चिपळूणमध्ये दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना सावधगिरीने वाहने चालवावी लागत असून वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. दरम्यान, या पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले असून शेतीला मोठा दिलासा मिळाल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.