रत्नागिरी : पावसाअभावी खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना आता सुरुवात झाली आहे. यावर्षी मान्सून उशिराने दाखल झाल्याने शेतीच्या कामांना काही काळ ब्रेक लागला होता. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला असून शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. जिल्ह्यात ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट आहे. सध्या कोकणातही अनेक ठिकाणी पारंपरिक नांगराऐवजी पॉवर टिलरचा वापर करून शेतीची मशागत केली जात आहे.