मुंबई – पुणे जिल्हयातील भोर तालुक्यातील नसरापुर गावात अवघ्या चार वर्षाच्या कोवळया मुलीवर अत्याचार करुन तिची दगडाने ठेचुन निर्घुण हत्या
करणा-या नसरापुरच्या नराधमाला भरचौकात लोकांसमोर फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
नसरापुरमधील हे बालिका अत्याचार आणि खुन प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे आहे. या प्रकरणाची माहिती कळताच ना. रामदास आठवले यांनी आपला तिव्र संताप व्यक्त केला आहे. नसरापुरमधील गावक-यांनी नराधम आरोपीविरुध्द केलेल्या निषेध आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.
पोलिसांनी त्या नराधम आरोपीला अटक केलेली आहे. त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे अशा तिव्र संतापाची भावना ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केली. आपला महाराष्ट्र, आपला भारत देश हा नितीमत्तेवर आधारलेला आहे. नीतिमत्तेवर आधारलेला समाज घडवायचा आहे. मात्र वारंवार अशा माणुसकीला काळिमा फासणा-या घटना घडत आहेत. हे अत्यंत चिंतेच आहे. समाजात माणुसकी शिल्लक राहिलीच नाही असा प्रश्न उपस्थित होतो. माणुसकीला काळिमा फासणारे प्रकरण रोखले पाहिजे. त्यासाठी नितीमत्तेवर आधारलेला समाज या देशात निर्माण झाला पाहिजे. नितीमत्तेला, माणुसकीला आग लावणा-या अशा प्रकरणातील नराधम आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी संसदेने कायदा केलेला आहे. नसरापुरमधील त्या नराधमाने केलेले दुष्कृत्य निंदनीय आहे.त्यास भरचौकात लोकांसमोरच फाशी दिली पाहिजे अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे. या प्रकरणाचा ना. रामदास आठवले यांनी तिव्र शब्दांत निषेध केला आहे.