खेड :- तालुक्यात कडक उन्हाळ्यामुळे जमिनीमधील पाण्याची पातळी कमी झाल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार लागल्याच्या पार्श्वभूमीवर १) घेरारसाळगड गावातील भराडे, धनगर वाडी, तांबटवाडी, बौद्धवाडी, पेठवाडी, २) निमणी – धनगरवाडी या टंचाईग्रस्त वाड्यांना पिण्याची टंचाई जाणवत आहे. म्हणून टॅन्करने पाणीपुरवठा करावा. अशी मागणी करणारे अर्ज प्रशासनालाच सादर केलेले असतानाच आणखी ३) कासई बोरवाडी, ४)खवटी खालची व वरची धनगरवाडी ५) हुंबरी म्हाळुंगे धनगरवाडी या दोन गावांमधील ग्रामस्थांनी टॅन्करने पाणी पुरवठा करावा. अशी मागणी पाणीटंचाईग्रस्त गाव/वाड्यांमधील ग्रामस्थांकडून होत आहे. आता प्रशासन कधीपासून पाणीटंचाईग्रस्त गावे वा वाड्यांना टॅन्करद्वारे पाणीपुरवठा करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुक्याचे आमदार तथा गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी यामध्ये विशेष लक्ष देवुन टंचाईग्रस्त गावे वाड्यांना टॅन्करने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रशासनाला आदेश द्यावेत. अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त होत आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- लक्ष्मी विरोधातील आंदोलन कर्त्यांची १३५ दिवसांनी प्रशासनाकडून दखल-खेडचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी घेतली भेट
- महिला खेळाडूंना सुरक्षित, सन्मानजनक व प्रोत्साहनपर क्रीडा वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार – आमदार चित्रा किशोर वाघ
- अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड होताच रोह्यात जल्लोष…
- लांजा नगरपंचायतीची प्लास्टिक विरोधात धडक कारवाई सुरू…
- अनिकेत तटकरे यांचा विजय दादांना समर्पित ;आज जे काही यश मिळवू शकलो ही दादांची पुण्याई – सुनिल तटकरे