चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चिपळूणकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर शहर परिसरात पावसाने हजेरी लावली असून, ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे.
कडक उन्हामुळे आणि वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांसह शेतकरी वर्गातही आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम असून शेतकरी बांधव आणि नागरिक मोठ्या आशेने वरुणराजाच्या कृपेकडे पाहत आहेत.