मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबाबत गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे.
परदेशी शक्तींकडे पंतप्रधान मोदी यांच्याबाबत संवेदनशील माहिती असून, त्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दबावात आणले जात आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कॉम्प्राईज्ड झाले आहेत, असा महत्वपूर्ण दावा त्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर ट्विट करत ते म्हणाले की, “मी बराच काळ सांगत आलो आहे की मोदी यांचे नेतृत्व स्वतंत्र राहिलेले नाही. परदेशी शक्ती त्यांच्या विरोधातील माहितीचा वापर करून स्वतःच्या हितासाठी निर्णय घ्यायला भाग पाडत आहेत.”
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात दोन मोठी आंदोलनं आयोजित केली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनांचा उद्देश हा मुद्दा जनतेसमोर मांडणे आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.
आंबेडकर यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत म्हटले की, “परकीय शक्तींच्या प्रभावामुळे मोदी यांचे नेतृत्व प्रभावित झाले आहे.”
दरम्यान, या मुद्द्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, सत्ताधारी पक्षाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
