लांजा: (गोविंद चव्हाण)उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. या निकालात लांजा शहरातील तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील आर्यन रविंद्र गुरव याने ८८.८३ टक्के गुण मिळवून लांजा तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तर लांजा महाविद्यालयातीलच वाणिज्य शाखेतील विवेक संजय मसणे याने ८७.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर याच महाविद्यालयातील शर्वरी संजय माने हिने ८२.५० टक्के गुण मिळवून तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. लांजा तालुक्याचा निकाल ९४.४७ टक्के इतका लागला आहे.